वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: १५ मिनिटे
८ ते १० लांबड्या मिरच्या
३/४ कप बेसन
१ टेस्पून तांदुळाचे पीठ
१/४ टीस्पून हळद
चिमूटभर खायचा सोडा
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
कृती:
१) मिरच्या धुवून घ्याव्यात. एका बाजूने चीर देऊन आतील बिया काढाव्यात. (टीप)
२) बेसन, तांदूळ पीठ, हळद, मीठ एकत्र करून घ्यावे. त्यात साधारण पाउण कपापेक्षा थोडे कमी पाणी घालून पीठ भिजवावे. सोडा घालून मिक्स करावे. पिठाची कन्सिस्टन्सी थोडी दाटसर असावी.
३) तळणीसाठी तेल तापत ठेवावे. मिरच्या पिठात बुडवून नीट कोट करून घ्याव्यात. मध्यम आचेवर टाळाव्यात.
गरमागरम सर्व्ह कराव्यात.
टीपा:
१) तुम्ही कोणत्या प्रकारच्या मिरच्या वापरत आहात त्यावर आतील बिया काढायच्या कि नाही ते ठरवावे. जर मिरच्या खूप तिखट असतील तर बिया काढाव्यात. किंवा काही जणांना भजी कदम झणझणीत असली तर आवडते. तर अशावेळी आवडीनुसार बिया कमी कराव्यात.
२) खूप जाड सालीच्या मिरच्या वापरू नये. त्या तळल्यावर पटकन शिजत नाहीत आणि भजी कचकचीत लागतात. त्यामुळे पातळ सालीच्या आणि मध्यम तिखट अशा मिरच्या घ्याव्यात.
३) मिरचीच्या आतील बिया काढून आत वेगवेगळे सारण भारत येईल. मी बटाट्याची तिखट भाजी (आले-लसूण लावून) आत भरली होती. आणि पिठात बुडवून नेहेमी प्रमाणे तळून काढली.
No comments:
Post a Comment