२ ते ३ जणांसाठी
वेळ: १५ मिनीटे
१ कप मोड आलेले आणि सोललेले वाल
१ टेस्पून तेल
१/४ कप सुके खोबरे, किसून
१/२ टिस्पून जिरे, भाजण्यासाठी
१/२ टिस्पून जिरे, फोडणीसाठी
१/८ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून तिखट
३-४ कढीपत्ता पाने
२ टिस्पून कोथिंबीर
२ आमसुलं
१ टिस्पून गूळ किंवा १ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ
कृती:
१) किसलेले सुके खोबरे खरपूस भाजून घ्यावे. जिरे खमंग भाजावे. भाजलेले खोबरे हातानेच चुरून घ्यावे. भाजलेले जिरे खलबत्त्यात कुटून घ्यावे.
२) डाळींब्या मिठ घालून अगदी किंचीत वाफवून घ्याव्यात. पुर्ण लगदा होवू देवू नये. वाफवलेल्या डाळींब्यातील थोड्या डाळींब्या चेचून घ्याव्यात.
३) पातेल्यात तेल गरम करावे. जिरे, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात डाळींब्या घालाव्यात. कपभर पाणी घालावेत. आमसुलं घालावीत. कुटलेले जिरे आणि भाजलेले खोबरे घालावे. मध्यम आचेवर २ मिनीटे उकळी काढावी. पातळपणासाठी गरजेनुसार पाणी घालावे. नंतर गूळ घालून १-२ मिनीटे उकळी काढावी. गरज वाटल्यास मिठ घालावे. एकदम मंद आच ठेवून थोडावेळ झाकण ठेवून आमटी मुरू द्यावी. कोथिंबीर घालून सजवावे.
गरमागरम तूपभाताबरोबर हि आमटी मस्त लागते.
टीप:
१) मी शिजवलेल्या डाळींब्या ५०% चेचून घेते आणि थोडया आख्ख्या ठेवते म्हणजे आमटी छान मिळून येते. फक्त फोटोत डाळींब्या दिसाव्यात म्हणून आख्ख्या ठेवल्या आहेत.
Labels:
Dalimbyanchi Amti, Dalimbi Amti
No comments:
Post a Comment